*सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........ झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎 कविता*
झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂
पान्याचे डबे आणून सोडी🚎
वाळकी झाडे पाहूया🎍🌾
मामाच्या गावाला जाऊया👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा🚱
हंडा रांगेत लावूया🏮🏮
मामाच्या गावाला जाऊया👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण😰
बिनआंघोळीचे राहूया😝
मामाच्या गावाला जाऊया👫
मामाची बायको गोरटी☺
म्हणेल कुठली कार्टी😜
पाण्यासाठी भांडुया😡
मामाच्या गावाला जाऊया👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आनल्यात चार💊
कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑
मामाच्या गावाला जाऊया👫
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🏵येड्या गबाळ्याने वाचू नये🏵
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
आणि यावर विचार ही करू नये
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
आपल्या देशातील लबाड माणसे
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
👶🏻ज्यांनी उत्तम शेती सांगितली
त्यांनी कधीही शेती केली नाही.
👶🏻ज्यांनी गाय पवित्र आहे सांगितले
त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही की तीचे शेण काढले नाही.
👶🏻सत्यनारायण सांगितला
कधीही सत्यनारायण घातला नाही.
👶🏻ज्यांनी अन्नदान महादान सांगितले
त्यांनी कधीही पुढ्यातला घास दुसर्याला भरवला नाही.
👶🏻ज्यांनी शांती सांगितली
त्यांनी कधीही शांती केली नाही
👶🏻ज्यांनी चारोधाम सांगितले
त्यांनी कधीही चारोधाम केले नाहीत.
👶🏻ज्यांनी फुले-सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब यांच्या महिला शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या.
👶🏻ज्यांनी पोथ्यामध्ये
सिमोल्लंगन/ परदेशगमनाला धर्मद्रोह/ पाप आहे असे सांगितले विरोध केला
ते सर्वात जास्त एन आर आय आहेत.
👶🏻ज्यांनी सदा कनिष्ठ नौकरी म्हटले
ते सर्वात जास्त नौकरीत आहेत.
👶🏻मातृ पितृ देवो भव म्हणणारांचेच
माता-पिता अनाथ आश्रमात आहेत.
👶🏻एकादशी अन्न खावू नका म्हणणारे
चिवडा खावून टुम्म होतात.
👶🏻कधीही मंदिर न बांधणारे
कायम मंदिरात असतात आणि तिथे कायम हक्क गाजवित असतात.
👶🏻इतरांना पारायण सांगणारे
कधीही पारायण ऐकत नाहीत.
👶🏻परशुरामाला माननारे
श्रीरामाच्या मंदिराचा वाद घालतात.
👶🏻शिवरायांची जन्मतारीख उपलब्ध असताना मुद्दामहुन शिवजयंतीचा तिथी आणि तारिख असा वाद पेटवितात व
पावलोपावली शिवरायांचा अवमान करतात.
पण स्वतः मात्र आपल्या बापजाद्यांचे जन्मदिवस तारखेप्रमाणेच करतात.
👶🏻वारक-यांना दिंडीत पायी पाठवणारे
स्वतः कारने प्रवास करतात.
👶🏻छत्रपतींना राजा होण्यास विरोध करणारे
यवनांचे पाय चाटतात.
👶🏻हिंदु राजा होण्यास विरोध करणारे
हिंदू राष्ट्राची मागणी करतात.
👶🏻धर्मांद पोपनी सॉक्रेटीस, कोपरनिकपस, गॅलीलिओ, येशू या विवेकवादी (विज्ञानवादी) महापुरुषांना सुळावर चढविल्याचे चूक आहे हे हळ-हळ व्यक्त करीत सांगतात.
स्वतः मात्र इथल्या विवेकवादचा चार्वाक, तुकोबा, रविदास, बसवेश्वर, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी करतात.
😳भारतातील लोक शिकले पण कधी शहाणे होतील ?
सत्यमेव जयते !!!
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🏵येड्या गबाळ्याने वाचू नये🏵
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
आणि यावर विचार ही करू नये
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
आपल्या देशातील लबाड माणसे
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
: एका वाचनात आलेले सुंदर ऋणानुबंध ...
🌹नाती जपून ठेवा स्वार्थ खूप झाला ,थोडी प्रीत पेरा गोफ सैल झाला.🌹
मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते .
|| *आई- वडील* ||
सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर
|| *गुरुजन* ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत
|| *आजी - आजोबा* ||
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती
|| *सासू - सासरे* ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप
|| *काका - मावशी* ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी
|| *आत्या - मामा* ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती
|| *मामा* ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार
|| *मामी* ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती
|| *दाजी* ||
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक
|| *बहिण* ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका
|| *भाऊ* ||
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद
|| *साडू* ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ
|| *साली / मेहुणी* ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी
|| *मावस भाऊ बहीण* ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय
|| *मेव्हण भाऊ बहीण* ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग
|| *भाचे भाची* ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं
|| *पुत्र* ||
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी
|| *पुत्री* ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती
|| *नातवंडे* ||
दुधावरली साय
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट
|| *मित्र मैत्री* ||
ईश्वरी वरदान
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं
विश्वासाची आधारशीला
स्वतःचेच प्रतिरुप
|| *शेजार धर्म* ||
मानवी मूल्यांचा ओझोन
संस्कृतीचा संधीप्रकाश
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन
|| *शिष्य* ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐 *सुंदर विचार*💐💐
जीवनात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही.इथे
श्वासालाही किंमत मोजावी लागते.एक श्वास
सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही..
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा
त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या
पानावर "जन्म" लिहिला आणि
तिस-या पानावर "मृत्यू" लिहिला.
जे दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात
आहे.मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते. या
दुस-या पानालाच "जीवन" म्हणतात. 🌺🌻🌞 शुभ सकाळ 🌞🌻🌺
"तुमचा दिवस आनंदात जावो"।
==============================
नासा च्या वैञानिकांना विचारलेले
काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली
उत्तरे
१) पृथ्वी अचानक स्वत:भोवती
फिरायची थांबली तर काय होईल?
उत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी
हे अशक्यच आहे तरीही असे
झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु
प्रकाशाच्या वेगाने अंतराळात
फेकल्या जातील, मातीचा एक
कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही,
संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल,
झाडेच काय गवताचेसुद्धा नामो-
निशान नसेल.
२) अंतराळात बंदुकीतुन गोळी
चालवली तर काय होईल?
उत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली
की आपल्या हाताला किंचीत
झटका बसतो परंतु अंतराळात
गोळी चालवल्या बरोबर तुम्ही
तब्बल पन्नास फुट मागे जाल.
आणि सुटलेली गोळी वेग न
बदलता कुठेही थांबणार नाही.
गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा
तिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा
कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची
गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास
ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा
करेल.
३) अंतराळात कसा वास येतो ?
उत्तर : अंतराळात वातावरण नस-
ल्याने व vaccum असल्याने तेथे
वास येत नाही परंतु अंतराळवीर
जेव्हा spacewalk करुन यानात
परतले तेव्हा त्यांना तसाच गंध
आला जो welding करताना
किंवा धातु द्रव अवस्थेत असताना
येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात
असलेल्या ions च्या टक्कर मुळे
उत्पन्न होतो
४) spacesuit न वापरता अंतराळात
गेल्यास काय होईल ?
उत्तर : spacesuit हा अंतराळातील
तापमान, अतिनील किरणे, कमी
दाब यांच्यापासुन बचाव करतो,
spacesuit न वापरता अंतराळात
गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरते-
मुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत
जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या
जीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे
बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु
होईल.
५) पृथ्वी दुप्पट मोठी असती तर?
उत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती
तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट
असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण
शक्तीमुळे मानवाला उभे राहणे -
सुद्धा कठीण झाले असते, परिणामी
मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट
राहिली असती.
६) पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्या -
भोवती फिरु लागली तर ?
उत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्या-
भोवती फिरु लागली तर त्याच वेगाने
ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी
केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख
होईल.
७) पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली
तर?
उत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी
होईल.
नक्की शेअर करा
============================
लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
"आपण एक दाणा पेरला असता,
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच रिटर्न मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असेल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून रिटर्न मिळणार यात काहीच शंका नाही!
*🌼सावधान🌼 *
*"पेरणी चालू आहे.."*
*काय पेरायच हे आपल*
*आपणच ठरवायच*
No comments:
Post a Comment